'आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार' ।। मुघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ।। उदगीर येथे नवीन पंचायत समिती उभारणीसाठी 9 कोटीचा निधी देणार ।। लातुर 299 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 213 नवीन बाधित

मुघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव 


शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळणार 


 आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याची घोषणा योगी आदित्यनाथ केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा १५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.


योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. या ट्विटमध्ये योगींनी म्हटले आहे, ‘आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या चिन्हांना कुठलेही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिन्द, जय भारत.’


या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि दस्तावेजदेखील असतील. यापूर्वी लखनौचे मुख्य पर्यटन सचिव जितेंद्र कुमार यांनी पर्यटन अधिका-यांना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या संग्रहालयात गॅलरी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. या गॅलरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळतील.


फडणवीसांकडून कौतुक


योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच या निर्णयाचे स्वागत केले. फडणवीस यांनी योगींचे ट्विट रीट्विट करत शिवरायांचा जयजयकार केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, असे ट्विट करत फडणवीस यांनी योगी सरकारचे कौतुक केले.



----------------------------------------------------


'आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार'- मदन शर्मा



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह कार्टुन व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती.


 मदन शर्मा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असल्याचं सांगत राज्यात गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचंही म्हटलं आहे.


या मुद्द्यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला असतानाच शर्मा यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आता आपण संघ आणि भाजपसाठी काम करणार आहोत. आता गुंडगिरी खपवून घेणार नाही. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पुनरुच्चारही केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते.


काही माजी सैनिकांनीही शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय सैनिक संस्था या निवृत्त सैनिकांच्या संघटनेनेही शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे मुंबई अध्यक्ष पंजाबराव लक्ष्मण मुधाने यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर येत्या तीन दिवसात सर्व निवृत्त अधिकारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.


----------------------------------------------------


उदगीर येथे नवीन पंचायत समिती कार्यालय उभारणीसाठी 9 कोटीचा निधी देणार - राज्यमंत्री संजय बनसोडे

 

  लातूर :

           उदगीर येथे नवीन अद्यावत पंचायत समिती कार्यालय उभाणीसाठी राज्य  शासन 9 कोटीचा निधी देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे  पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. 

          पंचायत समिती उदगीर येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीच्या   अध्यक्षस्थानावरुन राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. या बैठकीस नवनिर्वाचित पंचायत समितीची सभापती प्रा.शिवाजीराव मुळे, उपसभापती बाळासाहेब मरापल्ले, पंचायत समितीचे सर्व सदस्य,कल्याण पाटील, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उदगीरचे तहसीलदार व्येंकटेश मुंडे उपस्थित होते.

         यावेळी कृषी, आरोग्य, शिक्षण  विभागातील विविध विषयाचा आढावा घेण्यात आला . उदगीर  येथील शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. शालेय पोषण आहार,गुणवत्ता पुरक असावा याबाबत राज्य मंत्री श्री.बनसोडे यांनी निर्देश दिले. 

       पंचायत समितीच्या प्रत्येक सदस्यांना येणाऱ्या काळामध्ये वृक्षरोपन करण्यासाठी दोन हजार रोपे देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य यांनी केली. आमदार-खासदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी विकास निधी दिला जातो त्या प्रमाणे पंचायत समिती सदस्य,  जिल्हा परिषद सदस्य याना हक्काचा फंड असावा याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.बनसोडे यांनी सांगितले.

        पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व आंगणवाड्या ISO करण्यात येणार आहेत यासाठी सर्व मदत केली जाईल जनतेचा निधी योग्य खर्च झाला पाहिजे. महावितरण कंपनीच्या काही तक्रारी आहेत शेतकऱ्यांना विद्युत नवीन कनेक्शनसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे कोविड च्या पार्श्वभूमीवर शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, तसेच नगरपालिका कर्मचारी याचे पथक तयार करण्यात आली आहेत ही पथके प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत. मनरेगा अंतर्गत ज्या नागरिकांनी विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत त्याच्या नोंदी सातबारा नोंदी घेण्यात येतील अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

----------------------------------------------------


लातूर जिल्हा :




 आज प्राप्त झालेल्या 349 RTPCR अहवालांपैकी 246 अहवाल निगेटिव्ह आले असून 75 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 1085 Rapid Antigen Test पैकी 224 रुग्ण पॉझिटिव्ह तर 861 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 299 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 12816 झाली आहे, तर 9416 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2204 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 824 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 372 वर पोहोचला आहे.

 


----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 206 RTPCR अहवालांपैकी 97 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 56 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 53 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 510 Rapid Antigen Test पैकी 116 रुग्ण पॉझिटिव्ह तर 394 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 213 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 8958 झाली आहे तर 6641 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2056 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 261 वर पोहोचला आहे.








----------------------------------------------------





Popular posts
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
कोरोना रिपोर्ट चा घोळ अन् नगरच्या तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ! आज लातूर जिल्हा141 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
Image