मराठवाड्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा || मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा: संभाजी ब्रिगेड|| लातुर 285 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 201 नवीन बाधित





मराठवाड्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा,

 नागरिकांना सतर्कतेचा इशारा..



गेल्या काही दिवसांमध्ये परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.  अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आल्याने मोठ्याप्रमाणावर शेतीचे नुकसान झाली आहे. संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे.पुढच्या 24 तासांत मराठवड्यासह काही भागांमध्ये पाऊस पडेल  नांदेड, लातूर,उस्मानाबाद, बीड मध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात सरासरीच्या १००.८ टक्के पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  मराठवाड्याची सरासरी ६७९ मिमी आहे. तर आत्तापर्यंत ५८५ मिमी पाऊस झाला.




----------------------------------------------------



मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा : संभाजी ब्रिगेड



मराठा आरक्षण वर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.




----------------------------------------------------



लातूर जिल्हा :





आज प्राप्त झालेल्या 350 RTPCR अहवालांपैकी 176 अहवाल निगेटिव्ह आले असून 126 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 730 Rapid Antigen Test पैकी 159 रुग्ण पॉझिटिव्ह तर 571 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.  RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 285 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 14059 झाली आहे, तर 10640 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2016 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 990 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 413 वर पोहोचला आहे.

 


----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 203 RTPCR अहवालांपैकी 45 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 131 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 27 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 576 Rapid Antigen Test पैकी 156 रुग्ण पॉझिटिव्ह तर 420 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 201 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 10058 झाली आहे तर 7051 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2718 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 289 वर पोहोचला आहे.








 


 




Popular posts
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
कोरोना रिपोर्ट चा घोळ अन् नगरच्या तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ! आज लातूर जिल्हा141 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 104 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
Image