उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 207 RTPCR अहवालांपैकी 69 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 129 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 09 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 756 Rapid Antigen Test पैकी 122 रुग्ण पॉझिटिव्ह तर 634 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6411 झाली आहे तर 4027 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2200 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 184 वर पोहोचला आहे.
-----------------------------------------------------------
भारताने सावध व्हावे, अर्थव्यवस्थेचे पुढील अंदाज धडकी भरवणारे ;
नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची माहिती.
चीनची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल.
गीता गोपीनाथ
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाली.एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकासदर जीडीपी -२३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला. अनलॉकमधून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकार करत असले तरी दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल, असा भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) व्यक्त केले आहे.
देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात देशात उद्योगधंदे ठप्प पडले. बेरोजगारी वाढली. देशांतर्गत वस्तूंचा खप कमी झाला. यामुळे वृद्धीला खीळ बसली. यावर नजर असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दुसऱ्या तिमाहीतील विकासदराचे केलेले भाकीत धडकी भरवणारे आहे.'जी-२०' देशांच्या समूहाचा एक भाग असलेल्या भारताची आर्थिक स्थिती आणखी कमकुवत असेल असे नाणेनिधीने म्हटलं आहे. दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी हा उणे २५.६ टक्के इतका खाली घसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आतापर्यंतची जीडीपीतील ही ऐतिहासिक घसरण असेल, असे नाणेनिधीने म्हटलं आहे.
नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्या मते चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी जी-२० समूहात सर्वात कमी राहील. जी-२० देशांवर करोनाचा परिणाम सुरूच आहे, असे गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.जी-२० देशांचा विकासदर दुसऱ्या तिमाहीत नकारात्मक राहील, असे त्यांनी म्हटलं आहे. २०२० मधील तिसऱ्या तिमाहीपासून यात अर्थव्यवस्था सुधारू लागेल.
दुसऱ्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजनुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर उणे १०.९ टक्के इतका राहील, असे म्हटलं आहे.याआधी मूडीज या संस्थेने करोनामुळे जी-२० देशांचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. जी-२० देशांमध्ये भारत, चीन यासारख्या विकसनशील देशांचा समावेश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश`लोकसंख्या या जी-२० देशांचा हिस्सा आहे.
----------------------------------------------------------