मालवाहू रेल्वेने चिरडल्याने १६ मजूर जागीच ठार

करमाड ( ता . औरंगाबाद ) शेंद्रा एमआयडीसीच्या नवीन उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी पहाटे हा भीषण अपघात झाला . देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन आहे . यात अनेक मजूर अडकले असून आता सरकारने सर्वांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे . जवळ असलेली जमा पुंजी लॉकडाऊनमध्ये संपली . आता खायला आणि गावी जायलाही पैसे नसल्याने अनेक मजूर कुटुंबियांसह पायी प्रवास करीत आहेत . रेल्वेने सरळ रस्ता आहे , असे समजून १९ मजूर रुळावरून पायी चालत होते . चालून चालून थकल्यामुळे ते करमाडजवळ रुळावर झोपी गेले . पहाटे गाढ झोपेत असताना मालवाहू रेल्वे आली . मजुरांना झोपेत काहीही समजले नाही . रेल्वेने त्यांना चिरडल्यानंतर एकच आक्रोश झाला . घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलिस , रेल्वे सुरक्षा बल , ग्रामीण पोलिस अधिकारी , पोलिस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळकडे रवाना झाले आहेत .
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना गावाची ओढ लागली आहे . मिळेल त्या वाहनाने आणि दिसेल त्या रस्त्याने हे मजूर रस्ता कापित आहेत . रेल्वे रुळावरून चालत जाताना थकल्यावर ' आता कुठं रेल्वे सुरू आहे ' म्हणून रुळावरच अंग टाकलेल्या मजुरांना झोपेतच मालवाहू रेल्वेने चिरडले . यात १६ मजूर चिरडल्याने जागीच ठार झाले , सुदैवाने तिघांचा जीव वाचला .



Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image