गरज पडल्यास कोणत्याही क्षणी आर्मी - जी. श्रीकांत


लातूर - लातूर जिल्ह्यात अद्याप पर्यंत तरी एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले असून , पुढील काळात घराचे बाहेर कोणीही पडू नये , विनाकारण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल तसेच गरज पडल्यास आर्मी ला बोलावले जाईल .



ज्या दानशूर व्यक्ती व संस्थांना मदत करावयाची आहे त्यांनी परस्पर नागरिकांना देऊ नयेत , जी काही मदत जनतेला करावयाची आहे ती मदत आमच्याकडे जमा करावी , कारण आपल्या जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील तीन हजार नागरिक संभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, तसेच जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप केले जाणार आहे. रेशन कार्ड  पाहिले जाणार नसून त्यांची यादी बनवून त्या सर्व घटकातील नागरिकांना धान्य वाटप केले जाणार आहे . तसेच किराणा दुकान पाच वाजेपर्यंत चालू  ठेवण्यात येतील व सुपर मार्केट यांना यातून वगळण्यात आलेले आहे.



जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर दिल्यास कार्यवाही करण्यात येईल येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image