संकटाच्या काळात महाराष्ट्र देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो- उद्धव ठाकरे

मुंबई |  महाराष्टातलं लॉकडाउनला हे कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी प्रत्येकाने अजुनही घरात बसायला हवं, असं आवाहन केलं. कोणत्याही संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.


केवळ नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची बंधने कठीण करावी लागतील. कोरोनाचे युद्ध आपण जिंकणारच असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.



आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली, असल्याचं ठाकरे म्हणाले.


हे किती दिवस चालणार असं अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेल की जितकी आपण शिस्त पाळाल तितका तो लवकर संपेल. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहिलं. त्यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचं आहे या सुचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image