“मोदी द्वेषापोटी केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य राज्य सरकार वाटत नाही”

मुंबई | मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य तुम्हाला वाटायला अडचण काय ? असा सवाल करत , गोरगरिबांचा भूकबळी जाण्याचा सरकार वाट पाहतंय का ? ,अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.


मोदी द्वेषापोटी मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य अजून पर्यंत महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना वाटायला तयार नाही. महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का ? मोदी द्वेषापोटी तुम्ही दिवे लावणार नाही आम्ही समजू शकतो. मात्र मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य वाटायलाच पाहिजे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.


मोफत धान्य कधी देणार हे सरकारला विचारलं तर 15 एप्रिल नंतर देणार, असं सरकारने सांगितलं आहे. पण तोपर्यंत काय बोंबा मारायच्या का ? रेशन कार्ड असेल नसेल सरसकट प्रत्येकाला मोफत धान्य महाराष्ट्र सरकारने दिलेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे, असं राम कदम म्हणाले आहेत.



दरम्यान, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्डसुद्धा नाही, अशांची यादी तयार करून ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image