“दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”

मुंबई | दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा झाला हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे ,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओद्वारे आज भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज भाजपचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी हा संवाद साधला.


कोरोनाशी दोन हात करताना सगळा देश एकवटला आहे. सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने करोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. कोरोनाशी लढा देताना आपण गरीबीशी लढतो आहोत ही बाबही महत्त्वाची आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


कोरोनाशी दोन हात करताना भारताने केलेल्या प्रयत्नांचे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं आहे. करोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचं धैर्य पाहण्यास मिळालं असल्याचं मोदींनी सांगितलं.



काल रात्री गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, साक्षर-निरक्षर अशा 130 कोटी जनतेने एकजूट दाखवली, आपण एकटे नसल्याची सामूहिक भावना दिवे लावताना दिसली असल्याचंही मोदींनी म्हटलं.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image