महाराष्ट्र राज्याचा 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी...

मुंबई |  महाराष्ट्र राज्यातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत.


राज्यामध्ये आणि देशामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारांनी काय काय उपाययोजना केल्या आहेत, हे पंतप्रधान मोदी आजच्या बैठकीतून जाणून घेत आहेत. तसंच लॉकडाऊनसंबंधी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय मत आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


महाराष्ट्राला विविध पातळ्यांवर केंद्राची मदत लागणार आहे. केंद्राने मदत करून सहकार्य करावे, अशी विनंती उद्धव यांनी मोदींकडे केली. तसंच मोदींनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं.



बहुतांशी मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन वाढवावा, यावर एकमत असल्याची माहिती कळतीये. तर एका राज्यासाठी लॉकडाऊन आणि दुसऱ्या राज्यासाठी लॉकडाऊन शिथील करू नका. सगळ्या देशात एकच प्रणाली वापरली गेली पाहिजे, असं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलं आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image