खबरदार! जिल्ह्याची सीमा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड.

लातूर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आता जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या तरीही अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍यांचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. त्यामुळे आता लातूर जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांना २००० रुपये दंड आकारला जाणार आहे. 



राज्यात लाॅकडाऊन लागू केल्यापासूनच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यानुसार लातूर जिल्ह्याचाही सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या. लातूर जिल्ह्यात मागे आठ कोरोना बाधित आढळले होते त्यानंतर कालच आणखीन एक कोरोना ग्रस्त महिला आढळली आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आता आपत्ती निवारण विषयक नियमांचे कठोर अंमल करण्याचे आदेश दिले आहेत अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत तसेच दोन हजार रुपये दंडही वसूल केला जाणार आहे आणि त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image