म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जितेंद्र आव्हाड यांनी केलं कौतुक....

मुंबई | गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मात्र देशात लॉकडाउन असताना कर्नाटकातील भाजपचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं.


तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येडियुरप्पा आणि भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.



कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे एका आमदाराच्या मुलीच्या लग्नाला इतर 3000 पाहुण्यांसमवेत हजेरी लावतात. देश मोठ्या संकटाशी सामना करत असताना एका राज्याचा मुख्यमंत्री इतका बेजबाबदार कसा वागू शकतो?. महाराष्ट्र आज उद्धवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, कोरोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image