मुंबई, पुणे व इतर शहरांकडून आलेल्या लोकांकडे गावकडच्या लोकांनी संशयाने पाहू नये- आरोग्यमंत्री

मुंबई | पुण्या-मुंबईतील लोकं सध्या कोरोनाच्या भीतीने गावाकडे गेले आहेत. मात्र गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे संशयाने पाहू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं.


या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायचा आहे. गावात येणाऱ्या लोकांना अडवू नका, असं आवाहनही यावेळी त्यांनी गावाकडच्या लोकांना केलं. कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत ही खूपच दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे काळजी करू नये मात्र काळजी घ्या, असं ते म्हणाले.



अनेक ठिकाणी डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत. असं कृत्य करणं योग्य नाही. संचारबंदीतही आरोग्य सेवांना सूट दिलेली आहे. लोक आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? त्यामुळे ओपीडी बंद करु नका, अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली.


दरम्यान, बुधवारी गुडीपाडवा आहे. हा दिवस म्हणजे संकल्प करण्याचा दिवस असतो. त्यामुळे बुधवारी घरी बसून आपण संकल्प करूया आणि कोरोनाला हरवूया, असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image