लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची मागणी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र.

अहमदनगर | फडणवीस सरकारच्या काळात तयार झालेला लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधानसभेत सादर करून लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अण्णा हजारे यांनी या संदर्भात उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.माजी देवेंद्र फडणवीसांनी मी केलेल्या उपोषणावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. तरी राज्याच्या हिताकरीता लवकरात लवकर लोकायुक्त कायदा करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.



क्लास एक ते चारचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या गैरव्यवहाराचा कोणत्याही नागरिकांना पुरावा मिळाला तर ते पुराव्यांच्या आधाराने केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी करतील. त्यानुसार लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून अण्णा हजारे यांनी मौन व्रत पाळलं आहे. जोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशी होत नाही तोपर्यंत मौन पाळणार असल्याचं अण्णांनी सांगितलंय.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image