१ एप्रिल नंतर शासकीय निधी फक्त राष्ट्रीयकृत बँकांमध्येच - राज्य सरकार.

मुंबई | सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे आदींनी बँकेचे सर्व व्यवहार राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातूनच करावेत, असा निर्णय सरकारने आज घेतला. राज्यातील, तसेच देशातील काही खासगी बँकांमधील घोटाळे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारनं खबरदारी म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.



खासगी किंवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा निधी जमा करण्यासाठी उघडलेली खाती १ एप्रिलपासून बंद करून, केवळ राष्ट्रीय बँकांमध्येत खाती उघडावीत, असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, सोयीचं पडावं म्हणून त्यांची बँक खाती खासगी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली होती. त्यामुळं सरकारच्या निर्णयानुसार आता ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात यावीत, असं आवाहन सरकारने केलं आहे.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image