विरोधी पक्ष, सरकारी कर्चाऱ्यांच्या संघटनेच्या विरोधा नंतर तो शासन निर्णय माघारी! आणि केली एक नवी घोषणा.

मुंबई | सरकारी कर्चाऱ्यांच्या संघटनेच्या विरोधातनंतर आता राज्य शआसनाला आपला निर्णय फिरवावा लागणार आहे. आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार नाही, तर मार्चचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.


आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र अजित पवारांचा हा निर्णय तुघलकी म्हणत या वेतन कपातीला सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने विरोध दर्शवला आहे. तसंच विरोधी पक्ष भाजपने देखील सरकारच्या निर्णयावर टीका करत हा निर्णय माघारी घ्यावा, असं म्हटलं होतं.


राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रतिनिधींशी बोलून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं. मात्र यानंतरही संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांनी या निर्णयाला विरोध दर्शवणारं पत्र लिहिलं होतं. अखेर विरोधानंतर सरकारने आपला निर्णय फिरवला आहे.



दरम्यान, ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन देण्यात येणार होतं ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन दिलं जाणार होतं. सरकारनं ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र आता कोणत्याही श्रेणीच्या कर्माचाऱ्याच्या वेतनात कपात करण्यात येणार नाही.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image