जिल्हयातील खरीप हंगाम २०१९चा पीकविमा - ७०९ कोटी ८० लाख
लातूर : लातूर जिल्हयातील खरीप हंगाम २०१९चा पीकविमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झाला असून त्याची रक्कम ७०९ कोटी ८० लाख रुपये इतकी आहे . यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  गतवर्षीच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्या लांबल्या व परतीच्या पावसाने हाती आलेले पीक नुकसानीत गेले . त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता . खासदार सुधाकर श्रृंगारे , तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर , जिल्हाधिकारी जी . श्रीकांत व तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर यांनीही बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली होती . पीकविमा मंजूर झाल्याने शेतकरी थोडासा सुखावला आहे. जिल्हा बँकेकडे याद्या करण्याचे काम सुरू होईल व पैसे आल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत 



लातूर जिल्ह्यास खरीप हंगाम २०१९ चा पिकविमा ७०९ कोटी ८० लाख रुपये, तो खालील प्रमाणे.

१) लातूर तालुका - १२५ कोटी ४५ लाख

२) रेणापूर तालुका - १११ कोटी ८८ लाख

३) अहमदपूर तालुका - ६७ कोटी

४) चाकूर तालुका - ७५ कोटी 

५) उदगीर तालुका - ६३ कोटी ६७ लाख

 ६) देवणी तालुका - ३३ कोटी 

७) जळकोट तालुका - २५ कोटी ४४ लाख 

८) निलंगा तालुका - ८७ कोटी ७८ लाख

९) शिरूर अनंतपाळ तालुका - २८ कोटी २१ लाख 

१०) औसा तालुका - ९२ कोटी ५३ लाख .


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image